रत्नागिरी : दी न्यू एज्युकेशन सोसायटीच्या परशुरामपंत अभ्यंकर प्राथमिक विद्यामंदिरातील विद्यार्थ्यांनी आज (सहा सप्टेंबर २०१८) विविध संकल्प केले. या वेळी आचार्य म्हणून आगाशे विद्यामंदिराच्या मुख्याध्यापिका प्राजक्ता कदम उपस्थित होत्या.
दररोज सूर्यमंत्राचे पठण, सूर्यनमस्कार, अभ्यास मन लावून करीन, आरोग्याला हितकारक आहार घेईन, पानात वाढलेले सर्व पदार्थ आवडीने खाईन, चांगले बोलीन, समाजातील गरजूंना मदत करीन आणि झाडांचे संरक्षण करीन, असे अनेक संकल्प विद्यार्थ्यांनी केले. प्राजक्ता कदम यांनी विद्यार्थ्यांना साध्या, सोप्या भाषेत व गोष्टींमधून चांगले कसे वागावे हे सांगितले. तसेच सूर्यमंत्र सांगितला. या कार्यक्रमाला संस्थेच्या कार्याध्यक्षा अॅड. सुमिता भावे, सदस्या विशाखा भिडे, मुख्याध्यापक विनोद नारकर, ज्येष्ठ शिक्षक प्रकाश कदम आणि सर्व शिक्षक, पालक उपस्थित होते. शिक्षिका सौ. मोहिते यांनी सूत्रसंचालन केले.
(विद्यार्थ्यांचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)